जग बदलत आहे, परंतु माणसांची मानसिकता मात्र बदलत नाही. ते तरी काय करणार बिचारे सामाजिक परिस्थिथि अशी आहे कि ती त्यांना बदलूच देत नाही. मी, माझा , ते , त्यांचे हे असे शब्द जेंव्हा बदलतील तेव्हाच माणसांची मानसिकता बदलेल. दंगे- फसाद करून काय फायदा होतो, जे कमवायचे ते कमावतात, राजकारण्यांचा फायदा होतो, गुंडांचे फावते आणि भरडला जातो तो तुमच्या- आमच्यातला सामान्य माणूस. म्हणून आता तरी शहाणे व्हा आणि शहाण्यासारखे वागा. कारण जग बदलण्याची ताकद प्रत्येकात असते, फक्त त्या शक्तीला ओळखायला शिका, मग पहा हे विश्वच कसे बदलते ते.
चित्रपट : समीक्षा आणि सिद्धांत
भारत हा जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. परंतु चित्रपट हा अभ्यासविषय म्हणून आपल्याकडे पुरेसा रुजलेला नाही. वर्तमानपत्रांचे , मासिके व अन्य नियतकालिकांचे रकानेच्या रकाने चित्रपटविषयक मजकुराने भरलेले असतात. पुरवण्याच काय , स्वतंत्रपणे चित्रपटविषयाला वाहिलेली नियतकालिके सुद्धा कमी नाहीत. आकाशवाणी , दूरचित्रवाणी माध्यमांतून देखील चित्रपटांवर भरपूर बोलले जाते. पण त्यात कुठेही गंभीर समीक्षेला स्थान नाही. त्यात प्रामुख्याने असते ते गॊसिपिंग – कुजबुज – चर्चा. मग येतात वर्तमानपत्री परीक्षणे. यात चित्रपटांच्या गोष्टी लिहिलेल्या असतात ; अभिनय , संगीत , दिग्दर्शन यांच्याविषयी चार – दोन वाक्ये असतात आणि हा चित्रपट सर्वसाधारण समाजाला कितपत पाहण्याजोगा आहे , त्याचे रेटिंग – म्हणजे मूल्यांकन करणारे एखादे वाक्य किंवा स्टार्स दिलेले असतात. आणि यालाच चित्रपट समीक्षा मानण्याची प्रथा आहे. जी काही पुस्तके आहेत ती चित्रपटाचा इतिहास फुटकळपणे मांडणारी , गोष्टी सांगणारी , माहिती देणारी , आठवणीवजा... अ...
Comments
Post a Comment