Posts

Showing posts from 2015

निसर्ग

सकाळी उगवणारा सुर्य आणि संध्याकाळी मावळणारा सुर्य हा एकच आहे परंतु त्याच्या उगवणे आणि मावळणे या दोन क्रियांमध्ये माणसाच्या किती गोष्टी बदलत जातात, जसजसा सुर्य वर येत जातो, तसतशी माणसे आपली कामे करत राहतात. म्हणजे सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपे पर्यंत सारे काही सूर्याच्या क्रियेवर अवलंबून आहे. म्हणजे मानव मूलतः निसर्गावरच सर्वस्वी अवलंबून आहे, म्हणून या निसर्गाचा योग्य समतोल राखणे आपल्या हातात आहे. 

मी आणि वास्तव.

आज खूप कंटाळा आला आहे, काय करावे काही सुचत नाही, वाटले वर्तमान पत्र घेऊन वाचावे पण त्यात सुद्धा नेहमीच्याच बातम्या राजकारण, खून,बलात्कार, चोरी अगदी कंटाळा आला तेच तेच रोज वाचून. वाटले जावे कुठेतरी शांत ठिकाणी, आणि फिरावे एकांतात मन नेईल तिकडे, भटकावे आणि स्वैर धावावे सुद्धा, परंतु पुन्हा भानावर आलो, जावे वाटत असताना सुद्धा जावू शकत नाही, कारण या रोजच्या धकाधकीच्या जीवनाची आता सवय झाली आहे. लोकांच्या गर्दीत मिसळण्याची आणि त्यांच्यात विरून जाण्याची जणू जगण्याची रीतच बनली आहे. कारण हे वास्तव आहे. आणि ते स्वीकारले पाहिजे नाहीतर हे जग तुम्हाला झिडकारून देईल एका  काळोख्या कोपऱ्यात. हे जग आपले आहे, इथे आपली माणसे राहतात. आपले आई- वडील, भाऊ - बहिण, मित्र  आणि नातेवाईक, त्यांना सोडून जावेसे वाटत नाही. म्हणून कंटाळा करून चालणार नाही उलट नव्या उमेदीन कामाला लागून काहीतरी वेगळे करण्याची क्षमता ठेवली पाहिजे.

माझ्या बालपणीच्या आठवणी

माझ्या लहानपणीची एक मला आठवणारी कविता,                                                 "मला वाटते बसून विमानी                              अफाट गगनी हिंडावे                              केंव्हा सुंदर नौकेमाधुनी                              समुद्रातुनी भटकावे                                      निळा - निळा तो समोर डोंगर                                      चढून त्यावर पाहावे                       ...

Atiah M.Nakte

Image

माझ्या आठवणीतले गाव.

                                                        माझ्या आठवणीतले गाव. गाव सोडून शहराकडे आलो, दहा - बारा वर्ष झाली असतील, परंतु आजून आठवतेय ते आठवणीतले गाव. वाडीत तीस - चाळीस घरे आणि गावात सत्तर - ऐंशी घरं. सकाळ झाली कि गाव गजबजायचे, बायका पाणी भरण्यासाठी विहिरीवर जायच्या, काही घरांतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज यायचा, तर काहींची शाळेत जाण्याची घाई असायची शाळा साडे दहा वाजता असली तरी. भाकर - तुकडा आटपून पुरुष मंडळी आणि बायका शेतावर निघायच्या, पोर शाळेत गेलेली असायची, वाडी - गाव शांत व्हायचा. अशातच दुपार व्हायची, ते रणरणते उन, डोळे दिपायचे, मी कॉलेजमधून दुपारीच  घरी आलेलो    असायचो, वाडीत एक भयाण,निरव शांतता पसरलेली असायची. आर्धी घरे बंद तर अर्ध्या घरांचे दरवाजे उघडे असायचे कारण त्या घरांत कुणी म्हातारा किंव्हा म्हातारी असल्यामुळे... अचानक कुण्या घरातून तान्ह्या मुलाच्या रडण्याच्या आवाजाने ती शांतता भंग पावायच...
जग बदलत आहे, परंतु माणसांची मानसिकता मात्र बदलत नाही. ते तरी काय करणार बिचारे सामाजिक परिस्थिथि अशी आहे कि ती त्यांना बदलूच देत नाही. मी, माझा , ते , त्यांचे हे असे शब्द जेंव्हा बदलतील तेव्हाच माणसांची मानसिकता बदलेल. दंगे- फसाद करून काय फायदा होतो, जे कमवायचे ते कमावतात, राजकारण्यांचा फायदा होतो, गुंडांचे फावते आणि भरडला जातो तो तुमच्या- आमच्यातला सामान्य माणूस. म्हणून आता तरी शहाणे व्हा आणि शहाण्यासारखे वागा. कारण जग बदलण्याची ताकद प्रत्येकात असते, फक्त त्या शक्तीला ओळखायला शिका, मग पहा हे विश्वच कसे बदलते ते.
Image
-The Atish M. Nakte
Image
    My college Day's.....
आज सर्वत्र मार्केटींगच मार्केटिंग दिसत आहे ना, ताजे उदाहरण घ्या ना फिल्म ' ओह माय गौड' रिलीज झाला तेव्हा कुणाच्या भावना दुखावल्या नाही आणि 'पीके' पाहून ह्यांच्या भावना दुखावल्या. तरीपण चित्रपटाने करोडो रुपये कमावले. हाच तर मार्केटींगचा नवीन फंडा आहे, कुणाला वाईट वाटले असेल तर हा चित्रपट बंद का नाही केला? विचार करा. जग बदलत आहे , तंत्रज्ञानात प्रगती होत आहे, पैसे कमावण्यासाठी मार्केटींगच तंत्र हि बदलले आहे, दोघांच्या खोट्या खोट्या भांडणात जनतेची दिशाभूल करून आपला लाभ करून घ्यायचा, हाच खरा मार्केटींगचा नवीन फंडा आहे.