Posts

पहिला पाऊस, ट्रेन आणि त्याचे प्रेम..

Image
रात्र जरा बेधुंद होती, वाराही मस्त वाहत होता, आभाळात ढगांचा आणि चांदण्यांचा लपाछपीचा खेळ जणू सुरु होता. तो प्लॅटफॉर्म नं. 4 वर उभा राहून ट्रेनची वाट बघत होता, त्याने त्याचे मनगट वर केले, घड्याळात पाहिले, 9.30 झाले होते. अंधेरी स्टेशन वरून घरी जायला त्याला 9.31 ची ट्रेन होती. ट्रेन येतेय हे त्याला लांबून दिसले, त्याने मागे अडकवलेली बॅग पुढे केली जणू सगळी शस्त्र गोळा करून लढण्याच्या तयारीला सज्ज झाला आहे. ट्रेन येणार इतक्यात त्याच्या  घामाने डबडबलेल्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडू लागले, पाऊस सुरु झाला होता. त्या थंड वाटणाऱ्या पावसाच्या थेंबांनी त्याला खूप बरे वाटले. तेवढ्यात ट्रेन आली त्याच्यासारख्या कित्येक प्रवाश्यांची ट्रेन मध्ये चढण्यासाठी लढाई सुरु झाली. तो चढला, त्या 2 - 3 सेकंदात त्याने पूर्ण डब्ब्यात नजर फिरवली आणि एक विंडो सीट त्याला रिकामी दिसली जसे काही स्वर्गच भेटले या अविर्भावात तो त्या सीट वर जाऊन बसला. ट्रेन सुरु झाली आणि त्याने बॅगेतून हेडफोन्स काढले, ते  मोबाइलला कनेक्ट करून गाणी ऐकू लागला. पाऊस सुरूच होता.. वाराही सुटला होता.. काही थेंब अधून - मधून अंगाव...

कसरत तारेवरची आणि गमतीची..

Image
आरे बापरे !! 8 वाजून गेले , ऑफिस सुटायची वेळ निघून गेलीय , मी घाई - गडबडीत फ्रेश होऊन , ऑफिसातून निघालो .. नेहमीची बस मिळेल कि नाही या विचारात चालत असताना , मागे पहिले तर सिग्नल वर मला बस उभी आहे हे दिसले . जरा हायसे वाटले . मी स्टॉप वर तसाच थांबलो , जरा आभाळाकडे लक्ष गेले वारा सुटला होता , आणि आभाळ चमकत होते , अगोदरच खूप वेळ त्या स्टॉप वर वाट पाहणारा एक माणूस मला म्हणाला , बाळा विजा चमकत आहेत पाऊस येईल बघ आज . बस आली मी बस मध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश केला आणि एक   विंडो सीट पकडली , माझ्या मागे तो माणूस बस मध्ये चढला आणि तोही माझ्याच बाजूला येऊन बसला . मी तिकीट काढले , त्यांनीही तिकीट काढले , मी खिडकीतून बाहेर बघत होतो , मनात कुणाची तरी आठवण घोळत होती , आणि डोक्यात कुणाचे तरी विचार येत होते . बस स्टॉप वर स्टॉप घेत स्टेशन च्या दिशेने निघाली होती , तेवढ्यात माझ्या बाजूला बसलेला माणूस मला म्हणाला , " बाळा मी म्हणलो हुतो ना पाऊस येल ते " " वि...

मेघदूत "तिच्या" अन "त्याच्या" मधला..

Image
 आसमंत भारलेली तिन्हीसांजेची घटका पांघरून , दूर माळरानावर   उडालेल्या पक्ष्यांच्या चौफेर थव्यांत आणि बरसुनी येणाऱ्या मेघांच्या दाटिवाटीतून " त्याने " एका छोट्या मेघाला " तिला " निरोप देण्यासाठी पाठवले आहे . तो मेघ " तिला " भेटण्यासाठी निघाला आहे . तो जरा जिद्दी आहे आणि बहुदा हट्टी सुद्धा आणि जरासा वेडा . सूर्याच्या संधी प्रकाशात न्हाऊन निघालेला एक एकटा मेघ मंद वाहणाऱ्या वाऱ्यावर स्वार होऊन , जणू " कालिदासाने " आपल्या दूर अंतरी राहणाऱ्या प्रियेला निरोप धाडलंय या अविर्भावात संथपणे पुढे चालला आहे , पण " त्याला " तिच्या   भेटीची ओढ   आहे . " ती "  त्याचे सर्वस्व आहे . त्याचे प्रेम आहे , त्याचा श्वास आहे . वाटेत गर्जणारा मल्हार  तुफान   तांडव करून ह्या छोट्या मेघाच्या समोर उभा ठाकला परंतु न घाबरता तो पुढे चालत राहिला आहे.    वाटेत खूप तारका भेटत राहिल्या मंद - प्रकाशमान झालेल्या , पण तिकडे आकर्षित न होता ह्या मेघाला " तिच्य...

- दंगली वारे..

Image
                                                                    -  दंगली वारे..                                                                                                                                               - अतिश.. आरे काय चाललंय? माझ्या अमेरिकेला गेलेल्या मित्राने मला एक मेसेज पाठवला. मी तो मेसेज वाचून त्याला उत्तर दिले, "माझे ठीक चाललंय, पण आपल्या भारतात काही ठीक नाही चाललंय". त्याने पुन्हा मेसेज केला, 'का रे काय झाले अचानक'? ...

निसर्ग

सकाळी उगवणारा सुर्य आणि संध्याकाळी मावळणारा सुर्य हा एकच आहे परंतु त्याच्या उगवणे आणि मावळणे या दोन क्रियांमध्ये माणसाच्या किती गोष्टी बदलत जातात, जसजसा सुर्य वर येत जातो, तसतशी माणसे आपली कामे करत राहतात. म्हणजे सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपे पर्यंत सारे काही सूर्याच्या क्रियेवर अवलंबून आहे. म्हणजे मानव मूलतः निसर्गावरच सर्वस्वी अवलंबून आहे, म्हणून या निसर्गाचा योग्य समतोल राखणे आपल्या हातात आहे. 

मी आणि वास्तव.

आज खूप कंटाळा आला आहे, काय करावे काही सुचत नाही, वाटले वर्तमान पत्र घेऊन वाचावे पण त्यात सुद्धा नेहमीच्याच बातम्या राजकारण, खून,बलात्कार, चोरी अगदी कंटाळा आला तेच तेच रोज वाचून. वाटले जावे कुठेतरी शांत ठिकाणी, आणि फिरावे एकांतात मन नेईल तिकडे, भटकावे आणि स्वैर धावावे सुद्धा, परंतु पुन्हा भानावर आलो, जावे वाटत असताना सुद्धा जावू शकत नाही, कारण या रोजच्या धकाधकीच्या जीवनाची आता सवय झाली आहे. लोकांच्या गर्दीत मिसळण्याची आणि त्यांच्यात विरून जाण्याची जणू जगण्याची रीतच बनली आहे. कारण हे वास्तव आहे. आणि ते स्वीकारले पाहिजे नाहीतर हे जग तुम्हाला झिडकारून देईल एका  काळोख्या कोपऱ्यात. हे जग आपले आहे, इथे आपली माणसे राहतात. आपले आई- वडील, भाऊ - बहिण, मित्र  आणि नातेवाईक, त्यांना सोडून जावेसे वाटत नाही. म्हणून कंटाळा करून चालणार नाही उलट नव्या उमेदीन कामाला लागून काहीतरी वेगळे करण्याची क्षमता ठेवली पाहिजे.